Random Video

औरंगाबाद | शिवारात आणि डोळ्यात पाणीच पाणी..!

2021-12-07 1 Dailymotion

राब राबून हाताशी आलेले उभे पीक पावसाच्या तडाख्याने उद्‌ध्वस्त झालेले पाहण्याची वेळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आलीये.. औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील नागमपूर येथील शेतकरी विनायक दुबेले यांच्यावर दुहेरी संकट कोसळलयं, आधी अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादन घट झाली त्यात आता उरला सुरला कापूस वेचणीला आला असतानाच अवकाळी पावसाने होत्याच नव्हतं केलं. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..